पुणे : पुणे शहरामध्ये गुइलेन बॅरी सिंड्रोम (GBS) आजाराने थैमान घातलं आहे. या आजाराने आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असून पुण्यातच या आजाराचे १०० पेक्षा जास्त रुग्ण आहेत. पुणे शहारत गेल्या काही दिवसांपासून गुइलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) या आजाराचे रुग्ण वाढत असून शहरात या आजाराचे १४९ संशयित रुग्ण आढळून आले आहे. तर ३ संशयित रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. या आजारामुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असले तरीही एक दिलासादायक बातमी आहे.
आज पुण्यातील ससून रुग्णालय येथे गुइलेन बॅरी सिंड्रोम आजाराचे ५ रुग्णांना एकत्रित डिस्चार्ज करण्यात आला आहे. ससून रुग्णालयात जेबीएस रुग्णांचे २८ रुग्ण असून आज ५ रुग्णांना ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देत, पेढे भरवत डिस्चार्ज देण्यात आले आहे. यावेळी या रुग्णांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पाहायला मिळाले आहे.
आपल्याकडे सध्या २८ रुग्ण आहेत. गेल्या पंधरा दिवसापासून जीबीएस आजाराचे रुग्ण पुण्यामध्ये जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. १०० पेक्षा जास्त रुग्ण सध्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये या आजाराबाबत काही प्रमाणात भीती निर्माण झाली आहे. पण आनंदाची बातमी ही आहे की, आपल्याकडचे पाच रुग्ण व्यवस्थितरित्या बरे होऊन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येत आहे आणि येत्या दोन-तीन दिवसात आणखी १० रुग्ण बरे होतील. त्यांनाही डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे.
“नागरिकांनी भीती वाटून घेऊ नये, या आजाराची काही लक्षणे आहेत. पोट बिघडणे, ताप, सर्दी अशी काही लक्षणे जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवून घ्या. लवकरात लवकर उपचार चालू केले तर शंभर टक्के रुग्ण हा बरा होतो. परंतु आठ-दहा दिवसानंतर तुम्ही उपचार सुरू केले तर परिस्थिती अवघड होते. त्यामुळे रुग्णांनी घाबरून न जाता लवकरात लवकर उपचार सुरू करावे. या आजारापासून वाचण्यासाठी शुद्ध पाणी प्या. पाणी उकळून गाळून प्या आणि अन्न व्यवस्थित शिजवलेलं खा, किंवा बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे”, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-एलआयसी पॉलीसीच्या नावाखाली फ्रॉड, पण पुणे पोलिसांनी शेवटी ‘त्या’ टोळीला बेड्या ठोकल्याच
-मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची महत्वाची बैठक; फडणवीस, शिंदे अन् अजितदादांची नवा प्लान!
-Budget 2025: आता १२ लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त; केंद्रीय अर्थसंकल्पातून सामान्यांसाठी काय?
-केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारने शेतकऱ्यासाठी काय घोषणा केल्या?