पुणे : पुणे शहरात पाणी कपात वारंवार होताना जाणवते. एकीकडे पिण्याच्या पाण्याची मागणी वाढत आहे तर दुसरीकडे पुरवठा आहे तेवढाच राहिल्याचा थेट परिणाम पाणीपुरवठा विस्कळीत होण्यावर झाला आहे. गेल्या ४ दिवसांत तब्बल ४०० तक्रारींची नोंद महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे झाली आहे.
पुणे शहरात टँकरद्वारे होणाऱ्या पाण्याचा काळाबाजार याबाबत २ तक्रारी पालिका प्रशासनाकडे आल्या आहेत. उन्हाची धग वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याची मागणी वाढली आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रतिदिन १ हजार ६५० ते १ हजार ७०० दशलक्ष लिटर पाणी धरणातून घेतले जात आहे. गेल्या १५ ते २० दिवसांत प्रतिदिन ८० ते १०० दशलक्ष लिटर अधिकचे पाणी महापालिका धरणातून काढत आहे.
धरणातून पाणी जास्त उचलल्यावर पुरवठा व्यवस्थित व्हावा, अशी अपेक्षा असताना देखील शहरातील अनेक भागात पाणी मिळत नसल्याचं चित्र दिसत आहे. यामध्ये गेल्या ४ दिवसांपासून आणखी भर पडली आहे. विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या तक्रारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे मोठ्या प्रमाणावर येण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील फुरसुंगी, उरूळी, हडपसर, वडगावशेरी, पाषाण, औंध, धनकवडी, सुखसागरनगर, बालाजीनगर, आंबेगाव, धायरी, नऱ्हे या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
‘पाणी पुरवठ्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली असून गेल्या ४ दिवसांत ४०० तक्रारी आल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची मागणी वाढली असली तरी धरणातून वाढीव पाणी घेण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. पाणी पुरवठा विस्कळीत होत असलेल्या भागाला टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे,’ अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-जान्हवी कपूरचा सुशिलकुमार शिंदेंच्या मुलीसोबत व्हिडीओ व्हायरल; सिद्धिविनायक मंदिरात पोहचली अनवानी
-‘साहेबांना अन् मुलीला निवडून दिलं, आता सुनेला विजयी करा’; अजित पवारांची बारामतीत तुफान फटकेबाजी
-अजित पवारांकडून दुभंगलेली मनं जोडण्याचा प्रयत्न; ‘जनसंवाद सभे’चे आयोजन
-पाणी देण्यासाठी धमकावलं! शरद पवारांच्या टीकेवर अजित पवारांचा जोरदार पलटवार