पुणे : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बुधवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतनिमित्त पुण्यात होणाऱ्या धनगरी नाद कार्यक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमावरुन आता वाद निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. या कार्यक्रमासाठी गृहमंत्री अमित शाह यांना निमंत्रण देण्यात आलं आहे मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या कार्यक्रमास बोलवणार नसल्याचं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत. यावरुनच महायुतीत वादाची ठिणगी पडली.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी गोपीचंद पडळकरांवर टीका केली होती.’पडळकर हे शेख चिल्ली असल्याचे सूरज चव्हाण यांनी म्हणाले होते. आता, गोपीचंद पडळकर यांनी सूरज चव्हाण यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. टया बिनडोक लोकांना माहिती नाही मी २२ व्या वर्षीपासून सफारी गाडीतून फिरतो, तेव्हा तुम्हाला चड्डी पण नीट घालता येतं नव्हती’, अशा शब्दात पडळकरांनी पलटवार केला आहे.
सूरज चव्हाण काय म्हणाले?
“गोपीचंद पडळकर हा शेखचिल्ली माणूस आहे. जसा शेखचिल्ली फांदी कापताना तुटायचा बाजूने बसून स्वतःच झाडावरून पडला होता, तसा हा शेखचिल्ली महायुतीमधील नेत्यांवर बोलून स्वतःची राजकीय फांदी कापून घेतोय. या शेखचिल्लीला माहित आहे की, पवारांना विरोध केला तरंच राजकीय जिवंत राहू शकतो. पवारांशिवाय या शेखचिल्लीची मार्केटमध्ये किंमत झिरो आहे. अजित पवारांनी अनेक भाषणामध्ये अनेकदा सांगितलंय की, पक्षामध्ये प्रवेश देताना किंवा एखाद्याच्या कार्यक्रमाला जाताना समाजात त्याची प्रतिमा चांगली असावी, राजकीय पार्श्वभूमी चोरी, दरोडेखोरीची नसावी. स्वतःच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे अजितदादांना कार्यक्रमाला बोलवण्याची हिंमत पडळकरांनी केली नसावी”, असा सणसणीत टोला सूरज चव्हाण यांनी लगावला होता.
अजित दादा पवार यांनी अनेक भाषणामध्ये अनेक वेळा सांगितले आहे पक्षामध्ये प्रवेश देताना किंवा एखाद्याच्या कार्यक्रमाला जाताना समाजात त्याची प्रतिमा चांगली असावी,राजकीय पार्श्वभूमी चोरी,दरोडेखोरीची नसावी गोपीचंद पडळकरला स्वतःच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे अजितदादांना कार्यक्रमाला…
— Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) April 17, 2025
गोपीचंद पडळकरांचा पलटवार
“मी धनगराचा पोरगा आहे, मला असल्या चोऱ्या-माऱ्या करायची गरज नाही. प्रस्तापित व्यवस्थेच्या विरोधात जेव्हा मी बोलतो तेव्हा पोलीस, तहसीलदार असे प्रशासन वापरण्याशिवाय यांच्याकडे पर्याय नसतो. कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं हा आमचा विषय आहे, आम्ही ठरवू काय करायचं ते. तुमचे एवढे कार्यक्रम होतात आम्ही बोलतो का? हा समाजाचा विषय आहे, समाजाला वाटलं तुम्हाला बोलवावं तर तुम्हाला पण बोलवू”, असे गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
“हे मला दरोडेखोर म्हणतात, मी आजपर्यंत कधी या विषयावर बोललो नाही, पण हे सगळ राष्ट्रवादीचेच काम आहे. माझ्यावर मंगळसूत्र चोरीचा आरोप केला त्यावेळी त्यांच्या अपक्ष आमदार २००९ साली विधानपरिषदेत दोन अडीच हजार मतांनी पडला. मेलेल्या माणसांबद्दल बोलू नये पण त्यावेळेसचे गृहमंत्री आर आर आबा पाटील यांचा तो एकदम जवळचा व्यक्ती होता, मानस बंधू होते. ज्या लग्नाच्या लग्नपत्रिकेत माझा उल्लेख प्रमुख पाहुणा म्हणून होता, त्या लग्नात भांडण झाली तेव्हा मी तिथं उपस्थित नव्हतो. तरी देखील माझ्यावर केस टाकण्यात आली, हे राष्ट्रवादीचेच पाप आहे, असंही पडळकरांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणावरुन महायुतीमधील वाद शमणार की उफाळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या देखील प्रतिक्रियांंकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
महत्वाच्या बातम्या
-पुण्यात दर्गात घुसून राडा; खासदार कुलकर्णींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
-एकही अनधिकृत फ्लेक्स न उभारता साजरा झाला आमदार हेमंत रासनेंचा वाढदिवस
-‘लाड’क्या ठेकेदाराला लगाम, सुरक्षारक्षक पुरवण्याची निविदा विभागून दिली जाणार; नेमकं घडतंय काय?
-पुणेकरांच्या बाकरवडीत बनवाबनवी; ‘चितळे स्वीट होम’वर गुन्हा दाखल